शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

चलनाचे काय?

भारतात काय किंवा जगात काय, सगळीकडे नोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र चलनाबद्दल कुठे बोलले जात नाही. चलन वाढतेच आहे अन त्यामुळेच चलनवाढही. व्यावहारिक भाषेत महागाई वाढतच राहते. अमेरिकेतील बँक्स कोसळल्या. त्यांच्या मदतीसाठी अब्जावधींचे packages दिले गेले. जपानच्या बँक्स अडचणीत आल्या, त्यांनीही अब्जावधींचे packages दिले. युरोपातही तेच आणि भारतातही तेच. बँकांचे npa manage करण्यासाठी भारत सरकारनेही बँकांना packages दिलेत. याचाच अर्थ जगातील पैसा वाढतोच आहे. त्याचे परिणामदेखील जगापुढे आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी अर्थक्रांती फारशी महत्वाची नाही. त्यासाठी अर्थदृष्टी बदलावी लागेल. काल नागपुरात सरसंघचालकांचे एक व्याख्यान झाले. त्यात त्यांनी उपभोगांवर नियंत्रणाचा मुद्दा मांडला. अर्थात हे नियंत्रण सरकारी वा अन्य बाह्य नियंत्रण नक्कीच नाही. हे मानवाने स्वत:वर विचार आणि विवेकाने घालून घ्यावयाचे नियंत्रण आहे. ज्या अर्थदृष्टीची जगाला गरज आहे त्याचा हा एक पैलू म्हणता येईल. पण अमक्याने म्हटले, तमक्याने म्हटले याला फारसे महत्व नाही. सर्वसामान्य माणूस, वरपासून खालपर्यंत सगळा समाज यादृष्टीने किती अन कसा विचार करतो ते महत्वाचे आहे. रोज नवीन तंत्रज्ञान, रोज विकासाची नवीन चित्रे आणि मग पूर्ण उपभोग घेण्यापूर्वीच वस्तू, सेवा इत्यादी मोडीत काढणे, use and throw असले प्रकार सुरु राहिले तर विश्वकल्याणी अर्थदृष्टी निर्माणच होणार नाही. भविष्याचा वेध घेऊन उड्डाणपूल बांधायचा आणि त्याची उपयोगिता पूर्ण व्हायच्या आतच केवळ २० वर्षात तो पाडून टाकायचा. ही दृष्टी असेल तर न बोललेलंच बरं.

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा