सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

हिंदू अर्थशास्त्र

सध्याच्या चर्चांमध्ये एका गोष्टीची आठवण झाली. इ.स. १९९३. अयोध्येतील विवादित बाबरी ढाचा पडल्यानंतर रा.स्व. संघावर बंदी घालण्यात आली होती तो काळ. नागपूरला रेशीमबाग येथे एक बैठक होती. त्यावेळी सहसरकार्यवाह असलेले सुदर्शनजी त्या बैठकीला होते. २५-३० जणांची ती दिवसभराची बैठक होती. त्यात दुपारी चहानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. म गो. बोकरे यांना बोलावले होते. त्यांनी नुकताच Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी त्यांचा विषय मांडला आणि मग त्यावर अघळपघळ चर्चाही झाली. एक नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, संघटनेवर बंदी असतानाही रा. स्व. संघ अशा गोष्टी करीत असतो. राजकीय डावपेच, बंदी, त्यासाठी करावयाच्या बाबी हे सगळे असतानाही मुलभूत कामही सुरूच असते. हा संघाचा विशेष आहे. तर कट्टर कम्युनिस्ट असलेले डॉ. म. गो. बोकरे दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रयत्नाने अन संपर्काने पूर्ण हिंदुत्वनिष्ठ होऊन त्यांनी Hindu Economics हा ग्रंथ लिहिला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते. त्यातील चार महत्वाचे मुद्दे-

१) हिंदू अर्थशास्त्र विपुलतेचे अर्थशास्त्र आहे.

२) वर्तमान अर्थशास्त्रानुसार वस्तू वा सेवांचे भाव सतत वाढतात. हिंदू अर्थशास्त्रानुसार भाव सतत खाली यायला हवेत.

३) इस्लामी अर्थशास्त्रातील बिनव्याजी कर्जाची कल्पना उत्तम असून तिचा अंगीकार कसा करता येईल याचा सखोल विचार व्हायला हवा.

४) हिंदू अर्थशास्त्र हे दानाचे अर्थशास्त्र आहे.

- श्रीपाद कोठे

१३ डिसेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा