साधेपणा, सचोटी, सद्भाव या मार्गाने चालणारा समाज असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पण त्यासाठी प्रथम समाजाला याविषयी किमान आस्था असायला हवी. चांगुलपणा ही सिद्ध करण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची आणि अनुभव देण्याची गोष्ट आहे ही समज हवी. घरातल्या दोन व्यक्तींमध्येही चढाओढ सुरू झाली तर त्याचे रूपांतर कलहात होते. समाज तर कधीच कुटुंबाएवढा एकजिनसी नसतो. समाजात कलह होऊ नये आणि तो अधिकाधिक एकजिनसी व्हावा यासाठी केवढी काळजी घ्यावी लागेल? कोणी घ्यायची ही काळजी? ज्याला ती जबाबदारी आपली वाटते त्याने.
- श्रीपाद कोठे
७ डिसेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा