शेती उत्पन्नावर आयकर लावावा अशी चर्चा होत असते. मात्र शेतीतील अडचण ही की सरसकट निर्णय घेणे शक्य नाही. अमिताभ सारखे किंवा अनेक डॉक्टर्स, वकील, सीए, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी आदींनी आपले खरे उत्पन्न लपवण्यासाठी शेती घेतली आहे. पण करोडो शेतकरी असे आहेत की ज्यांना शेतीचा खर्च आणि जगणे यांची तोंडमिळवणी करणेही कठीण होते. शिवाय शेतीच्या समस्याच वेगळ्या आहेत. एकाच गावी आजूबाजूला असलेल्या शेतीतून सुद्धा सारखे उत्पन्न होईल असे नाही. एकाने माल काढून घरी आणला अन दुसऱ्याचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आला तर एक तरला दुसरा बुडला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सरसकटीकरण नाही करता येत.
- श्रीपाद कोठे
७ डिसेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा