संजीवन समाधीच्या दिवशी सहज एक मनात आलं; ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दोन्ही रचना माऊलींच्याच, पण दोन्हीच्या भाषेत एवढा फरक का? ज्ञानेश्वरीची भाषा कष्टपूर्वक समजून घ्यायलाही कष्टच होतात. उलट हरिपाठ सहज लक्षात येतो. असं का असावं. भाषेचा हा फरक कसा समजून घेता येईल?
- श्रीपाद कोठे
७ डिसेंबर २०२१
आशयानुसार भाषा जड वा सुलभ असूच शकते, नव्हे असतेच. जसे गीतारहस्य वाचताना अर्थ कदाचित लागणार नाही पण भाषा जड असूनही अडचणीची वाटत नाही. ज्ञानेश्वरीचा अर्थ हृदयंगम होणे हा मुद्दा नाहीच. भाषा सहज वाचणे शक्य आहे वा नाही हा आहे. बाकी हरिपाठ सुद्धा समजणं एकदम सोप्पं आहे वगैरे मी म्हणणार नाही. त्यासाठीही एक बैठक आणि तयारी हवीच. असो. एखाद्या भाषातज्ज्ञाकडून फुरसतीने समजून घ्यावे लागेल.
@@@@@@
अगदी हेच माझ्या मनात येतं ...नेहमीच येतं....
मला हरिपाठ पाठ आहे.. त्यामुळे नेहमीच हा फरक जाणवतो...🙏🙏
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥
मला माझ्या श्रीगुरु निवृत्तिनाथांनी दिलेले ज्ञान 'प्रमाण' आहे . ते ज्ञान मी हरिपाठामध्ये दिले आहे आणि त्यायोगेच मी संजीवन समाधी साधली आहे .
हरिपाठरूपी ज्ञानप्रकाशात सतत रहाणे हीच संजीवन समाधी .
॥ सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज की जय ॥
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा