सोमवार, २७ जून, २०२२

व्रत

क्ष व्यक्तीने य व्यक्तीच्या कल्याणासाठी व्रतवैकल्य, उपासतापास करणे चुकीचे वा गुलामीचे कसे ठरू शकते? स्व बाजूला सारून विचार व्यवहार करण्याची उत्कटता, उदात्तता कोणात नसतेच किंवा कोणातच असू शकत नाही; असे म्हणणे तर्कसंगत होऊ शकत नाही. जगातील सगळेच लोक (स्त्रीया वा पुरुष) आपल्यासारखेच स्वार्थी, एकांगी, संवेदनशून्य असतात असे ठरवण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला? अन उत्कट जगणे नेहमीच लादलेले असते असे तरी कसे म्हणता येईल? तुमच्यात चांगुलपणा नसेल तर नसू देत; पण बाकीच्यांमध्ये तो नसतो; किंवा चांगुलपणा हा दबावातूनच जन्माला येतो; किंवा चांगुलपणा म्हणजे दुबळेपणा; किंवा चांगुलपणा म्हणजे मूर्खता; असे ठरवणाऱ्या लोकांनी थोडे तपासून घेतले तर बरे. माझ्यासाठी प्रार्थना करणारे जगात कोणीही नाही; तरीही माझे हे मत आहे. उलट त्यामुळे माझ्या मताची किंमत आणि तटस्थता वाढते असे मला वाटते. (संदर्भ- कालची वटपौर्णिमा)

- श्रीपाद कोठे

२८ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा