आषाढी एकादशीचे महत्व आणि उल्हास महाराष्ट्रासाठी विशेष असतातच. पण देशभरातच देवशयनी एकादशी म्हणून आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. यावर्षी कोरोनामुळे त्या सगळ्यालाच अडथळा आला आहे. अडथळा हे वळणही असू शकते या तर्काने, कोरोनाने आणलेला अडथळा सुद्धा वळण ठरू शकतो. तो तसा ठरावा आणि दैवतांचे मानुषीकरण अन माणसांचे दैवतीकरण यातून भक्तीमार्गाने पुढे सरकावे. अर्थात भारतीय परंपरेप्रमाणे प्रतिमाभंजन न करता. विश्वशक्तीचीही कदाचित तशीच योजना असावी.
- श्रीपाद कोठे
१ जुलै २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा