योग्य, खरं, श्रेयस्कर बोलू न शकणे; ही सगळ्याच राजकारण्यांची आणि राज्यकर्त्यांची पंचाईत असते. अन वर्तमानात विचार आणि शहाणपण राजकारणाच्या दावणीला बांधल्यामुळे; योग्य, खरं आणि श्रेयस्कर यांची समाजातून उचलबांगडी झाली आहे. (संदर्भ - मुंबईत तीन दिवसात लोकलमधून पडून १७ जणांनी प्राण गमावले. जबाबदारीचा आणि उपायांचा अमाप उहापोह होईल, पण शहरांचा अन जीवनाचा 'मुंबई' pattern चूक आहे अन तो बदललाच पाहिजे हे कोणी चुकूनही म्हणणार नाही.)
जय हो.
- श्रीपाद कोठे
२९ जून २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा