शनिवार, २५ जून, २०२२

स्वसंवेद्य

`चांगलं नि वाईट दोन्ही निरर्थकच. मग चांगलं, चांगलं म्हणत उर का फोडून घ्यायचा? कशाला काही अर्थ नसतो.' रेल्वेच्या डब्यातील चर्चासत्रात एकाने खडा सवाल टाकला. वादात सहभागी दुसरा चूप बसला. खिडकीबाहेर पाहत मी मलाच हाच प्रश्न घातला. म्हटलं - काय उत्तर? `मी'ने मला उत्तर दिले- `चांगलं नि वाईट आरसा आहेत. चांगलं हा स्वच्छ आरसा, वाईट हा धूळभरला आरसा. एकात तुझं प्रतिबिंब दिसेल. दुसऱ्यात नाही दिसणार. तू त्यात कुठेच नाही. पण तुला तुझी ओळख व्हायला आरसा स्वच्छ हवा एवढेच. ओळख झाली, ठीकठाक आहोत हे तुझंच तुला पटलं की झालं. आरसा टाकून उंडारायला तू मोकळा. चांगल्याचा आटापिटा तेवढ्यासाठी. बास.'

`हं... स्वसंवेद्य' आकाशवाणी झाली.

- श्रीपाद कोठे

२६ जून २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा