समाजाने जबाबदारीने वागले पाहिजे हे खरेच आहे, अन सोबतच समाजात काय सुरू आहे हे शासन प्रशासनालाही ठाऊक असायला हवे. सगळ्या समाज घटकांशी, सगळ्या राजकीय पक्षांशी; event or no event, incident or no incident; सातत्याने संवादाची प्रक्रिया का होत राहू नये? शिवाय - कालपर्यंत झाले असेल वा नसेल; पण प्रस्ताव, कल्पना, योजना, निर्णय; याबद्दल व्यापक पूर्वचर्चा करण्याची नवीन राजकीय कार्यशैली विकसित करायला काय हरकत आहे? शासनाने काही करायचे, त्यावर कोणी काही प्रतिक्रिया द्यायच्या, त्यावर चर्चा करायच्या, जबाबदाऱ्यांचा काथ्याकूट करायचा, उपदेशांचे रतीब घालायचे; अन वेळ, पैसा, बुद्धी, ऊर्जा, व्यवस्था, infra structure यांचा अपव्यय पाहात उसासे टाकायचे; एवढंच चालेल का? यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं यावर प्राधान्याने विचार का करण्यात येऊ नये? विरोधकांना चुकायला भाग पाडण्याचे राजकारण यशस्वी असते की नाही हा वेगळा मुद्दा, पण ते चांगले नसते हे मात्र नक्की. साम्राज्यवादाच्या प्रशासकीय मानसिकतेतून बाहेर येणे must आहे.
- श्रीपाद कोठे
१७ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा