वृंदावनाला जाताना तीनेक किमी आधी - चिलीम पिणारा भंगी - मीही भंगी आहे.
: अलवार नरेश मंगळसिंह यांच्या दिवणांच्या घरी - भिक का मागता - शिकारीत वेळ का घालवता; मूर्तीपूजा मानत नाही - चित्रावर थुंका.
: राजस्थानात अबूच्या पहाडावर एका गुहेत राहत असताना मुस्लिम वकीलाशी ओळख झाली. त्याच्या घरी राहिले. तिथेच खेत्री संस्थानचे दिवाण जगमोहनलाल यांची भेट झाली. त्यांच्या माध्यमातून राजे अजितसिंग यांच्या घरी गेले.
: घोड्यावर बसणे, खेळणे इत्यादी.
: खेत्रीचे महाराज अजितसिंग यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. एक प्रकारे राजगुरू पद त्यांना बहाल केले. पाय चेपून देत.
: एक दिवस नर्तिकेचे गायन ठेवले होते. संन्यासी असल्याने आपण येऊ शकणार नाही असे स्वामीजींनी सांगितले. गायिका दुखावली गेली. पण काही न बोलता तिने सूरदास यांचे भजन - प्रभू मोरे अवगुण चित ना धरो, सम दर्सी है नाम तीहारो, चाहे तो पार करो - म्हंटले. माफी मागितली. अनेकदा ही घटना सांगत. नंतरच्या काळात या भजनाचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला होता. त्यांचे विदेशी शिष्य हे भजन म्हणत असत.
: निरीक्षण आणि आत्मपरीक्षण.
: लिमदी संस्थानात. राजे ठाकूर जसवंतसिंग इंग्लंड, अमेरिकेला जाऊन आले होते.
: जुनागड संस्थानात. द्वारकेला गेले. पोरबंदर संस्थानात. तेथील शंकर पांडुरंग हे कारभारी विद्वान होते. त्यांना फ्रेंच व जर्मन भाषा येत होत्या. त्यांचे मोठे ग्रंथालय होते. इथे वेदांचे अध्ययन आणि भाषांतर केले
: महाबळेश्वर, इंदोर, उज्जैन, खंडवा, मुंबई, पुणे (टिळकांच्या घरी आठ दहा दिवस. एका क्लबमध्ये भाषणही केले. लोक येऊ लागले तेव्हा एका पहाटे निघून गेले. कोल्हापूरला.)
: बेळगाव. म्हैसूर. म्हैसूरचे महाराज. धारवाड. केरळातील एर्नाकुलम, कोचीन. त्रिवेंद्रम. कन्याकुमारी ला समुद्रातील शिळखंडावर तीन दिवस, तीन रात्र चिंतनात घालवले.
कन्याकुमारी हून रामेश्वरम्, मद्रास, हैद्राबाद. खेत्रीचे महाराज अजितसिंग यांना पुत्ररत्न झाल्याने पुन्हा खेत्रीला गेले. तिथून मुंबईला येऊन जहाजाने अमेरिकेकडे.
शिकागो परिषदेच्या उद्घाटन सोहोळ्याच्या रात्री श्री. लायन यांच्या घरी झोपू शकले नाहीत. उशी आसवांनी भिजून गेली.
: भारतात परतताना लघुलेखक जोशुया गुडविन यांचा प्रश्न आणि त्याला उत्तर. भारतावर माझे प्रेम होते आता ती माझ्यासाठी तीर्थ भूमी झाली आहे. धुळीचा प्रत्येक कण पवित्र आहे.
: त्यांच्या मागोमाग श्रीमती बुळ, जोसफैन आणि मार्गारेट नोबल भारतात आल्या. बेलुरला राहिल्या. हिमालयात तीर्थयात्रेला गेल्या. सोबत अमेरिकन राजदुताच्या पत्नी ही होत्या. कोलकात्याला शाळा सुरू केली. या सगळ्या संबंधात भारत हा विषय प्रामुख्याने राहत असे. याच विषयावरून मार्गारेट शी खटकाही उडत असे.
: निवेदिता यांचा अभिप्राय.
कोलंबो ते अलमोडा. कराचीलाही गेले होते. या भाषणांचा नंतरच्या कार्यावर व व्यक्तींवर प्रभाव.
: आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, धार्मिक दृष्टीने भारताला घडवण्याचा प्रयत्न कसा केला ही वेगळी गाथा आहे.
: भारत काय आहे? मद्रासच्या भक्तांना पत्र - हिंदू धर्माचे पुनरुत्थान. काय या भारताचा नाश होईल? छ... तसे झाल्यास काय होईल?
पुस्तकाची १७ पानं एवढं ते दीर्घ पत्र आहे.
भारतासाठी मी काय करू, या निवेदिता यांच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं - भारतावर प्रेम कर.
हे प्रेमच काय करायचं हे सांगत राहील. स्वामी विवेकानंद यांचा हा संदेश आहे आणि तेच त्यांच्या जीवनाचं सारही आहे.
काय भारताच्या अस्तित्वाचा लोप होईल? उदात्ततेचे, नीतिमत्तेचे, आध्यात्मिकतेचे प्राचीन आदिपीठ अशा भारताचा लोप होईल? ते शक्य नाही. तसे झाल्यास - जगातील सगळी आध्यात्मिकता लयास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्माविषयीचा सहानुभूतीचा मधुर भाव नाहीसा होईल आणि त्या जागी स्थापना होईल - कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोडमूर्तीची. पैसा होईल त्यांचा पुरोहित. फसवेगिरी, पाशवी बल आणि स्पर्धा या होतील त्यांच्या पूजेच्या पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बळी. छे छे... असे होणे कदापि शक्य नाही.
गुरुदेवांच्या स्वभावात खोलवर रुजलेल्या देशप्रेम व बांधवांच्या दुःखाविषयीची चीड या परस्परविरोधी भावनांचा मेळ कसा घालावा हे त्यांचे त्यांनाच समजत नसे. त्या काळात मी त्यांना बहुधा रोज भेटत असे. भारताखेरीज इतर कोणताच विचार त्यांच्या मनात येत नाही हे मी पाहत होते. ते पायाचा एक दगड म्हणून कार्य करीत होते. राष्ट्रीयता असा शब्द ते कधी वापरीत नसत किंबहुना राष्ट्रीय घडणीचा तो काळ होता असा त्यांनी कधी दावाही केला नाही. त्यांना मानवता जागृत करायची होती पण ते वृत्तीने एक उत्कट प्रेमिक होते. त्यांची मातृभूमी हा त्यांच्या प्रेमाचा एकमेव विषय होता. एखाद्या नाजूक घंटिकेतून जसा सूक्ष्म आंदोलनाने सुद्धा ध्वनी निघावा त्याप्रमाणे मातृभूमी विषयीची बारीक-सारीक वेदनाही त्यांच्या हृदयाच्या तारा छेडी. दुःखाचा एखादा आवाज कानी पडला तरी त्यांच्या मनात त्याचा प्रतिध्वनी उमटे. देशबांधवांनी भीतीने फोडलेली एखादी किंकाळी किंवा कमकुवतपणामुळे त्यांचा उडालेला थरकाप स्वामींना कळला नाही; अगर त्यांनी तो समजावून घेतला नाही, असे कधी होत नसे. अपमानित होऊन मागे घेतलेल्या भारतीयांच्या प्रत्येक पावलाची त्यांना लगेच चाहूल लागे. आपल्या लोकांच्या पापांविरुद्ध किंवा व्यवहारशून्यते विरुद्ध त्यांच्या न्यायाचा आसूड निष्ठुरपणे उठे. कारण त्या उणिवा स्वतःच्याच आहेत असे ते मानित. उलट भारतीयांच्या थोरवीचे व उज्वल भवितव्याचे चित्र त्यांच्याइतके स्पष्ट पाहू शकणारा आणि त्या स्वप्नाने भारून गेलेला दुसरा एकही द्रष्टा सापडेल असे मला वाटत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा