अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे भाषण ऐकण्याचा काल योग आला. पुष्कळ छान विषय त्यांनी मांडले. एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे- योग्य शब्दांच्या उपयोगाचा. योग्य शब्दांच्या अभावी योग्य अर्थ, नेमका भाव प्रकट होत नाही, पोहोचत नाही, गोंधळ उडतो असा एक विचार त्यांनी मांडला. याबद्दल बोलताना ते म्हणाले- सांप्रदायिकता म्हणजे communalism नाही, धर्म आणि religion एक नाही, व्यावसायिक म्हणजे commercial नाही. मला हे फार महत्वाचे वाटले. मुख्य म्हणजे श्रीपाद जोशी डाव्या विचारांचे आहेत. परंतु डाव्या, उजव्या, मधल्या असे करण्यापेक्षा; समन्वयाचे, सहकार्याचे, सहयोगाचे, सहविचारांचे बिंदू वेचणे केव्हाही चांगले. नाही का? स्व. दीनदयाळ उपाध्याय यांचा `सही शब्द, सही अर्थ' या शीर्षकाचा एक लेखच होता, ही माहिती निघताना त्यांना दिली. त्यांनीही ऐकून घेतली.
- श्रीपाद कोठे
२४ जून २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा