चित्रवाणीवर कार्यक्रम गळत होता. अभिनेता संदीप पाठक त्याचा वारीतील अनुभव सांगत होता. एका वारकऱ्याजवळ फक्त १४० रुपये होते. त्याने आश्चर्याने विचारले, 'एवढ्यात भागेल?' वारकरी म्हणाला, 'जेवण्या, राहण्याची सोय होते. पैसे लागतातच कशाला?' संदीप पाठक सांगत असताना ऐकणारे आश्चर्यमुद्रा करत होते. वारकऱ्यांच्या या मनोभावाचं मूळ काय याचा विचार मात्र त्यापैकी फार कुणी केला नसेल. मग तो मनोभाव बाळगणं आणि आपापल्या मनाचे धनाकर्षण मर्यादित करणं दूरच. भारतीय विचाराने वित्तेषणा, पुत्रेषणा, लोकेषणा हा जीवनाचा भाग आहे हे मान्य केले; अन सोबतच ती मर्यादित, नियंत्रित असावी हेही आग्रहाने सांगितले. वारकरी हे या भारतीय विचारांनी जगणारे लोक आहेत; अन त्यांची चर्चा करणारे नेमके त्याविरुद्ध, सगळ्या एषणा अधिकाधिक अमर्याद, अनियंत्रित असाव्यात असं सांगणाऱ्या अभारतीय विचारांनी जगणारे आहेत. दोन्हीचे परिणाम वेगवेगळे आहेत. जगासमोर आहेत.
- श्रीपाद कोठे
३० जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा