शुक्रवार, २३ जून, २०२३

समाज की झुंड?

 - राजकीय तमाशाचा मनसोक्त आनंद घेणारे भरपूर आहेत.

- राजकीय तमाशाची चिरफाड करणारे भरपूर आहेत.

पण...

- राजकीय तमाशामुळे होणाऱ्या पैशाच्या, वेळेच्या, ऊर्जेच्या, प्रशासन ठप्प झाल्याच्या नुकसानाची चीड येणारे फार कोणी दिसत नाहीत.

- ज्यांना चीड येते, संताप येतो त्यांना cool राहण्याचा सल्ला दिला जातो, त्यांची मस्करी होते किंवा संत होण्याची अपेक्षा केली जाते.

- मात्र ज्यांना या तमाशाचा राग येत नाही ते संवेदनाहीन आहेत हे कोणी म्हणत नाही.

- ही समाज माध्यमे आहेत की असामाजिक माध्यमे?

- आपण समाज आहोत की जनावरांची झुंड?

- आपल्याला स्वार्थ आणि बदमाशा चालतात. पण त्याचा राग वा संताप येणं आपण चुकीचं समजतो. कोणत्या तराजूत तोलायची आपली महानता?

- श्रीपाद कोठे

२४ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा