- राजकीय तमाशाचा मनसोक्त आनंद घेणारे भरपूर आहेत.
- राजकीय तमाशाची चिरफाड करणारे भरपूर आहेत.
पण...
- राजकीय तमाशामुळे होणाऱ्या पैशाच्या, वेळेच्या, ऊर्जेच्या, प्रशासन ठप्प झाल्याच्या नुकसानाची चीड येणारे फार कोणी दिसत नाहीत.
- ज्यांना चीड येते, संताप येतो त्यांना cool राहण्याचा सल्ला दिला जातो, त्यांची मस्करी होते किंवा संत होण्याची अपेक्षा केली जाते.
- मात्र ज्यांना या तमाशाचा राग येत नाही ते संवेदनाहीन आहेत हे कोणी म्हणत नाही.
- ही समाज माध्यमे आहेत की असामाजिक माध्यमे?
- आपण समाज आहोत की जनावरांची झुंड?
- आपल्याला स्वार्थ आणि बदमाशा चालतात. पण त्याचा राग वा संताप येणं आपण चुकीचं समजतो. कोणत्या तराजूत तोलायची आपली महानता?
- श्रीपाद कोठे
२४ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा