शुक्रवार, २३ जून, २०२३

कौटिल्याच्या दंड

शासन हे क्षीणदंड आणि उग्रदंड दोन्हीही नको हे सांगताना आर्य चाणक्य म्हणतात-

`दंडशक्तीचा अजिबात उपयोग न केल्यास मात्स्यन्याय सुरु होतो. उलट नेहमी दंडशक्तीचाच वापर केल्यास प्रजा त्रस्त होते. दंडाचा यथोचित वापर केला तर प्रजा धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थाची उपासना करू शकते. उलट कोठलाही विवेक न ठेवता, अज्ञानामुळे अथवा कामक्रोधाला बळी पडून दंडशक्तीचा वापर केल्यास वानप्रस्थी व संन्यासी देखील खवळतील. मग गृहस्थाश्रमी खवळतील यात नवल ते काय?' (कौटिलीय अर्थशास्त्र - अधिकरण पहिले, भाग चौथा)

- श्रीपाद कोठे

२४ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा