शनिवार, १७ जून, २०२३

पाण्यापासून इंधन

एक जण सांगत होता, आता पाण्यातून हायड्रोजन काढून त्याचा इंधन म्हणून वापर करणार. चांगलं आहे. पण पाण्यातून हायड्रोजन वेगळा केल्यावर पाणी हे पाणी राहील का? नाही राहणार. जगासमोर आजच पाण्याची समस्या असताना पाणी आणखीनच कमी उपलब्ध होणार. हे योग्य होईल का? हायड्रोजन वेगळा करण्यासाठी फक्त सांडपाणी वा वापरलेले पाणीच उपयोगात आणले जाईल असं ठरवलं तरीही जमिनीत मुरणारे वा बाष्पीभवन होणारे पाणी तर कमी होईलच. पडणाऱ्या पाण्याची साठवणूक वाढवून त्याचा वापर केला जाईल असं समजलं तरी, या मानवाची राक्षसी इंधनभूक आणि मिळणारे पाणी यांचा मेळ जमेल का? शिवाय निसर्गाच्या अंगभूत चक्रात काय बदल होतील ते कसे सांगता येतील. तेव्हा पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही. पण सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. एखादी गोष्ट सुरू करायची आणि मग फरपटत राहायचं हे काही बरोबर नाही. मानवाची राक्षसी भूक कमी करण्याबद्दलही बोलत राहायला हवं असं वाटतं.

- श्रीपाद कोठे

१८ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा