एका प्रामाणिक सज्जनाने विचारलं - तुला काय म्हणायचं तेच कळत नाही. तुझा विरोध कशाला असतो तेच समजत नाही. अर्थकारण असो, समाजकारण असो, राजकारण असो, चालू घडामोडी असो, निसर्ग असो, पर्यावरण असो, मनोरंजन असो... कोणताही विषय असो. लिहितो चांगला वगैरे ठीक पण कशाला विरोध? कशाला समर्थन? काहीच समजत नाही.
त्याला म्हटलं - माझा कशालाच विरोध नसतो. अन कशालाच समर्थन. माझा फक्त अविचार आणि अविवेक यांना विरोध असतो. अर्थात मला जो अविचार आणि अविवेक वाटतो त्याला.
त्याला हे समजलं का माहिती नाही. कारण यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
- श्रीपाद कोठे
६ जून २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा