बुधवार, ७ जून, २०२३

Conviction of life

सध्या चर्चाच चर्चा सुरू आहेत. गंमत येते आहे. रंजन पण होतं आहे. क्वचित प्रबोधन पण. चर्चांमधील एक विषय आहे सरसंघचालकांचे ताजे भाषण. त्या भाषणाचे अर्थ, अन्वय, गर्भितार्थ वगैरे समजावले, मांडले जात आहेत. त्यातील राजकारण आणि धोरण (diplomacy) यांचीही चर्चा आहे. पण खरंच ते भाषण धोरणात्मक आहे का? माझे मत नकारात्मक आहे. सगळ्यांना फक्त राजकारण आणि diplomacy एवढंच करायचं असतं असं समजण्याचं कारण नाही. अनेक जण व्यक्ती म्हणून वा समूह म्हणून conviction of life ने चालत असतात. And it pays. एकूणच संघाच्या भूमिका conviction of life मधून येतात. त्या प्रकट करताना वेळ, परिस्थिती यांचा विचार होत नसेल असे नाही. पण sangh means it when it says something. बोलायचे एक, मनात वेगळे असे नसते. अन यासाठी सरसंघचालकांच्या तीस मिनिटांच्या त्या भाषणातील पहिल्या दहा मिनिटांचे भाषण पण महत्त्वाचे आहे. ते जरा तात्त्विक वगैरे असल्याने कोणाला त्याकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यातून विविध अर्थ काढता येत नाहीत. त्यामुळे त्यावर अकटोविकट चर्चा करता येत नाहीत. पण विचारांच्या त्या उंचीपर्यंत गेल्याशिवाय फारसा अर्थबोध होणेही कठीणच असते. एक मात्र खरे की, conviction of life मधून ज्यावेळी काही प्रकट होते तेव्हाच ते परिणामी असते. आपल्याला पटो न पटो. आवडो न आवडो. धोरणात्मक गोष्टी फारच ठिसूळ असतात. स्वामी विवेकानंद शिकागो परिषदेत बोलले तेव्हा ते conviction of life होते. धोरण नव्हते. अन त्यामुळेच संबोधनाच्या अवघ्या पाच शब्दांनी सगळा समूह उभा राहून अभिवादन करता झाला. स्वामीजींच्या पाठीशी ना सत्ता होती, ना संपत्ती, ना संघटना. होते ते केवळ सत्यदर्शनातून प्रकट झालेले conviction of life. त्यापुढे कोट्यवधी धोरणेही धराशायी होत असतात.

- श्रीपाद कोठे

८ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा