माल्या, मोदी आदींची जप्त केलेली संपत्ती बँकांना देण्याचा सरकारचा निर्णय अतिशय योग्य असाच आहे. ही रक्कम फार नसली तरी ही कृती समर्थनीय आहेच. यानंतरही या कर्जबुडव्या लोकांची संपत्ती जप्त करून ती बँकांना देऊन बँका सशक्त कराव्या. अन या बड्या कर्जबुडव्या धेंडांप्रमाणे देशातल्या मोठ्या आणि छोट्या लोकांचीही संपत्ती जप्त करून बँका आणि सरकार यांचे खजिने भरावे. छोटे कर्जबुडवे याचा अर्थ ज्यांनी बुडवलेली वा थकवलेली कर्जे काही कोटी रुपयात आहेत ती. लाख आणि हजारातील कर्ज फेडू न शकणारे वा न फेडलेले यांना वेगळा न्याय लावलाच पाहिजे. त्यांचे व्यवहार विसरून जावे किंवा कानाडोळा करावा असे नाही. पण त्यातील प्रत्येकाचा स्वतंत्र विचार करून गरज, परिस्थिती, कायदा, मानवीयता; असे सगळे पैलू विचारात घ्यावे एवढेच. मात्र पैशाच्या माजात असणाऱ्यांना दयामाया न दाखवता जप्तीचा वेग वाढवून खजिने भरावे. तसेही; आधी कोणीतरी काही चुका, गडबडी केल्या असतील त्याची भरपाई बाकीच्या निरपराध लोकांनी का करायची? ज्यांनी केलं त्यांनाच भरायला लावलं पाहिजे. अन ही सरकारची जबाबदारी असायला हवी.
- श्रीपाद कोठे
२४ जून २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा