सोमवार, ५ जून, २०२३

परिवर्तन

व्यक्तिगत वा सामाजिक परिवर्तन कसं होतं? आजकाल असं समजलं जातं की, खूप टीका केली, दोष दाखवले, चिकित्सा केली, चूक किंवा बरोबर हे सिद्ध केलं, प्रतिपक्षाला निरुत्तर केलं, विखारी बोललं; की परिवर्तन होऊन जातं. किमान या गोष्टींनी परिवर्तन व्हावं ही अपेक्षा असते. परंतु परिवर्तन असं होत नाही. अन सगळ्याच गोष्टींच्या टपरीछाप चर्चा करूनही परिवर्तन होत नाही. होऊ शकत नाही. अनेक गोष्टींची चर्चा पुरेशा गांभीर्याने करायची असते. टवाळकीच्या सुरात किंवा शेरेबाजी करून नाही. आजच एक सूचना फेसबुकवर वाचली की, टीव्ही चर्चा बंद कराव्या. हे कसे होईल माहिती नाही पण अतिशय सार्थ अशी ही सूचना आहे. टीव्ही चर्चांनी नुकसानच जास्त झाले आहे आणि होते. मुख्य म्हणजे विचार ही एक गंभीर बाब आहे याचा विसरच या चर्चांनी पाडलेला आहे. त्या बंद कशा होतील यावर विचार व्हायला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

६ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा