सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

कळकळ ठीक, समाजवाद नको

- वेळ आलीच तर मुले आई वडिलांनाही सांगतात, आमची जास्त काळजी करू नका.

- सरकारनेही कधी लोकांवर असं सांगण्याची पाळी आणू नये.

- समाजाविषयीची कळकळ आणि समाजवाद या भिन्न बाबी आहेत. कळकळीच्या भावनेतून समाजवाद यायला नको.

- आपल्या देशात व्यवहाराची गरज म्हणून नियम आदी राहिले आणि सोबत जीवनाच्या आदर्शांचा जागरही राहिला. त्यातून व्यक्ती आणि समाज यांचं संतुलन साधण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.

- आज आदर्शांचा जागर मोडीत काढून केवळ नियमांच्या आधारे समाजाची घडी बसवण्याचा प्रयत्न होतो. तो अपूर्ण, चुकीचा, अयोग्य आणि घातक आहे.

- व्यक्तीने समाजाची आणि समाजाने व्यक्तीची बूज राखली तरच शांति आणि संतुलन राहील. वरचढ होण्याचा प्रयत्न विनाशकारी.

- श्रीपाद कोठे

१२ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा