मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

संघशाखेत विनोबाजी

संघ कार्यालयात राहणारे ज्येष्ठ प्रचारक शंकरराव तत्ववादी यांनी लिहिलेली एक आठवण काल वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. भूदान आंदोलनाच्या वेळी देश भ्रमण करताना, १९६० मध्ये विनोबा भावे काशीला गेले होते. त्यांना संघाच्या शाखेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आणि ते स्वीकारून विनोबा काशी येथील संघाच्या शाखेत गेले होते. तिथे थोडा वेळ बोलले होते. ही आठवण लिहिणारे शंकरराव यांनी स्वतः त्या कार्यक्रमात गीत म्हटले होते. एक ऐतिहासिक तथ्य म्हणून ही आठवण महत्त्वाची आहेच, पण भारत जोडो म्हणजे काय किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजे काय किंवा साधे सहजीवन म्हणजे काय; हे सांगणारी ही आठवण आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विनोबांना बोलावणे आणि विनोबांनी शाखेत जाणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. ही आठवण लिहिताना शंकररावांनी विनोबांचा उल्लेख पूज्य विनोबा असा केलेला आहे हेही आवर्जून सांगितले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा