जग ज्यांना माझी माणसं म्हणतं वा म्हणू शकतं त्यांना कदाचित आवडणार नाही. तरीही - 'विक्रम'चा संपर्क तुटणे हा पराजय आणि 'विक्रम'चा ठावठिकाणा सापडणे हा विजय, असं असतं का/ असावं का/ असू शकतं का? माझ्या खांद्यावर असलेले पिल्लू गाईचे आहे की बकरीचे आहे की गाढवाचे आहे की घोड्याचे आहे; हे मला निश्चित माहीत असणे पुरेसे का नसावे? कोणी तरी भरीस घालतात म्हणून लगेच अरे ला का रे करून; साध्य काय होते आणि नुकसान काय होते, याचा हिशेब मांडायला हवा की नको? माणसाला माणूसपणाच्या दिशेने नेणाऱ्या गोष्टीच करण्याचा प्रयत्न योग्य वाटतो. बाकी गोष्टी टाकून देणे वा दुर्लक्षित करणेच श्रेयस्कर. स्वतःला वाया घालवणे कसे थांबवता येईल हा माणसांच्या चिंतनाचा विषय होऊ शकला तर ते अधिक उपयोगाचे होईल, असं वाटतं.
- श्रीपाद कोठे
८ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा