नागपूर शहरात ध्वनी प्रदूषण खूप वाढलं असून ५५ ठिकाणे red zone आहेत. यावर उपाय करण्यासाठी एक मोठी बैठक झाली. यात NEERI या महत्त्वाच्या संस्थेचाही सहभाग होता. त्यामुळे या प्रयत्नाला वजन प्राप्त होते. या बैठकीत ज्या उपायांची चर्चा झाली त्यात 'डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान' असा एक उपाय आहे. हा उपाय थोडा संभ्रम निर्माण करणारा वाटतो. डांबरी रस्त्यांचे पुनरुत्थान म्हणजे रस्ते डांबरीच असावेत याचा पुरस्कार का? तसे असेल तर झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या सिमेंट रस्त्यांचे काय? किंवा झाले गेले सोडून देऊन पुढे जायचे असल्यास, यापुढे सिमेंट रस्ते बंद अशी काही भूमिका असू शकते का? तसे असेल तर सध्याचा सिमेंट रस्त्यांचा निर्णय आणि आग्रह नीट विचार न करता घेतला होता असं म्हणावं का?
- श्रीपाद कोठे
११ सप्टेंबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा