शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

अधीरता आणि गाणी

अधीरता (anxiety), धीराचा अभाव ही अलीकडे मोठी समस्या झाली आहे. या समस्येला खतपाणी घालणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये, आजकालची गाणी हे देखील एक कारण आहे. त्यातील शब्द, नृत्य या गोष्टी तर आहेतच पण ताल/ ठेका/ तालवाद्यांचा वापर हा खूपच मोठा भाग आहे. सामान्य आवाजात सुद्धा ऐकली तरीही त्यांचा परिणाम विपरीतच होतो. शिवाय न ऐकणाऱ्यांना त्रास हा भाग वेगळाच. घराघरात यावरून होणारे वाद हा आणखीन एक मुद्दा. शिवाय दुसऱ्यांचा विचार करणे म्हणजे पाप ही समजूत. अशा स्थितीत या गाण्यांच्या निर्मितीवरच बंदी का घातली जात नाही? हेही तर प्रदूषणच आहे नं? गाड्यांच्या प्रदूषणासाठी हजारो रुपयांचा दंड करता येऊ शकतो तर या प्रदूषणासाठी काहीच का नाही? अशी गाणी वाजवणारे 'माणूस' म्हणण्याच्याही लायकीचे नाहीत एवढे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

२४ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा