मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

द्वेष प्रवचन

आज राहुल गांधी केरळमध्ये जे बोलले त्याचं मी स्वागत करतो. द्वेष करणं सोपं आहे पण योग्य नाही. त्याने राष्ट्र निर्माण होत नाही, असं ते म्हणाले. हे विचार योग्यच आहेत. फक्त एक प्रश्न विचारावा वाटतो की, त्यांचे हे विचार त्यांचा पक्ष, त्यांचे समर्थक अन् ते स्वतः यांच्यासाठीही आहेत की नाहीत. म्हणजे द्वेष बाकीच्यांनी केला तर वाईट पण आपण केला तर वाईट नाही, असे तर नाही ना? कारण महात्मा गांधीजींच्या हत्येपासून, तर आणीबाणी, त्यानंतर इंदिरा गांधी यांना झालेली अटक, नागपूरचे nsui अधिवेशन ते तहत श्री. प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमात येईपर्यंत; देशाचा अनुभव शंका घेण्यासारखा आहे. अन् देशाचा अनुभव केवळ ऐकीव नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या अटकेनंतर तर घरावर दगड आल्याचेही अनुभवले आहे. तेव्हा राहुलजींनी त्यांचे विचार थोडे आणखीन स्पष्ट केले तर बरे. अन् रोजच संघावर तोंडसुख घेत असतानाच आपण संघाचा द्वेष करतो की नाही हेही सांगून टाकावे. संघाचा द्वेष करत नसतील तर मोठे मन दाखवून नागपूरला भेट घ्यायला येणार का? तसेही त्यांचे भाऊ वरुणजी नागपूर संघाच्या उत्सवात आले होतेच. त्यामुळे संघाला गांधींचे वावडे नाहीच. आता आपल्याला संघाचे वावडे नाही, आपण संघाचा द्वेष करत नाही हेही स्पष्ट झाले तर दुधात साखर.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा