निसर्ग सध्या भरपूर पाणी देतो आहे. बहुतेक सगळीकडे साठवण क्षमता उरलेली नाही. आणखीन मिळणारे पाणी साठवण्यासाठी असलेले वापरावे लागेल. त्यामुळे रोज पाणीपुरवठा करावा. परंतु पाऊस थांबल्यावर, पुढचे चार-पाच महिने एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. असे केल्यास उन्हाळ्यात रोज पुरवठा करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील आणि पुढील मान्सून विलंबाने आला तरीही फार ओढाताण होणार नाही. पुढले चार-पाच महिने पाण्याची गरज तशीही कमी असते. रोज पाणी देऊन लोकांची वाया घालवण्याची सवय पोसण्यापेक्षा एक दिवसाआड देऊन पाणी वापराला थोडी शिस्तही लावता येईल.
- श्रीपाद कोठे
१२ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा