दुसऱ्यांच्या सुखात सुखी होणे.
आपलं स्वतःचं सुख.
------
दोन्ही खरं असतं अन आवश्यकही. दुसऱ्यांच्या सुखात सुखी होण्याची भावना नसेल तर व्यवहारात तर अडचणी येतातच, पण आपलं माणुसपण ऱ्हास पावतं. अन आपलं स्वतःचं सुख (आपलं रमणं, आपलं विश्व) नसेल तर उभं राहायला आधारच उरत नाही. सोबतच दुसऱ्यांच्या सुखात सुखी होण्याची, सहभागी होण्याची शक्ती आणि शक्यताही उरत नाही. या दोन्हीच्या कक्षा व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असतात. साचेबद्ध नसतात. त्यातून मार्ग काढत जाताना माणूस प्रगल्भ होत जातो. कोणत्याही एकाचा अट्टाहास योग्य म्हणता येत नाही.
- श्रीपाद कोठे
३० जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा