आजकाल अनेकदा अनेक जण चाणक्य तोंडावर फेकतात. पण गड्यांनो, चाणक्यनीती ही राजा आणि राज्यकारभार यांच्यासाठी होती/ आहे.
तुमच्या माझ्यासाठी नितीशतक होते/ आहे.
विचार नावाच्या विचारशून्य कालव्याने आपण वेढून गेलेले आहोत. बाहेर पडायला हवं रे गडयांनो. विचार म्हणजे भूमिका नाही. राजकीय भूमिका तर नाहीच नाही. विचार म्हणजे उत्तर देणे नाही, उत्तर शोधणे. विचार म्हणजे समजून घेणे. विचार म्हणजे निर्णयाचे समर्थन नव्हे. विचार म्हणजे समाधानाची जुळवाजुळव नव्हे. विचार ही गुदगुल्या करणारी, गोड गोड गोष्ट नव्हे.
- श्रीपाद कोठे
१ ऑगस्ट २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा