सोमवार, १८ जुलै, २०२२

हिंदू विश्व

२०२० साली भारत आणि २०३० साली जग हिंदू राष्ट्र होणार, या अशोकजी सिंघल यांच्या वाक्याने चर्चा सुरु झाली. त्यात चूक काय आहे? अन जणू काही अशोकजींनी म्हटले म्हणूनच असे काही होणार आहे. अशोकजींनी म्हटले काय वा न म्हटले काय; किंवा विहिंप, संघ वा अशाच अन्य संघटना यांनी म्हटले काय वा न म्हटले काय... सगळे जग हिंदू होणारच आहे. कोणी म्हटल्याने वा केल्याने नाही तर जगाची तीच नियती आहे म्हणून. कोणीच ती बदलू शकत नाही. हां त्यासाठी प्रयत्न केल्यास थोडे लवकर ते घडून येईल अन त्या लोकांना अन संघटनांना थोडेबहुत श्रेय मिळेल. पण कल्पना करा की उद्या या संघटना वा ही माणसे नसली किंवा त्यांनी काम करणे थांबवले तरीही जग हिंदू होणार हे विधिलिखितच आहे.

- श्रीपाद कोठे

१९ जुलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा