चार मराठी वृत्त वाहिन्या पाहिल्या. त्यातील तीन वाहिन्यांनी 'गटारी अमावस्या' असा शब्दप्रयोग केला. एका वाहिनीने मात्र श्रावण सुरू होण्याचा आदला दिवस असे शब्द वापरले. मुद्दा मांसाहार, दारू हा नाही. पण पारंपरिक पवित्र दिवसाचं पावित्र्य, त्यातील भाव; यांचं जाणूनबुजून विडंबन; त्या भावाला जाणूनबुजून पायदळी तुडवण्याची वृत्ती; त्या गंभीर भावाची जाणूनबुजून मस्करी; हा मुद्दा आहे. त्यामुळेच हा शब्द वापरणारे आणि त्याला उचलून धरणाऱ्या वृत्तवाहिन्या यांचा त्रिवार निषेध. अन हीच भावना जर मनात असेल तर त्या लोकांनी तरी श्रावण पाळावाच का? खरं तर श्रावण पाळणाऱ्या आणि त्यासाठी अमावास्येला जिभेचे चोचले पुरवून घेणाऱ्या लोकांनीच 'गटारी' या शब्दाला विरोध करायला हवा. अन्यथा त्यांच्या श्रावण पाळण्याला काहीच अर्थ नाही.
- श्रीपाद कोठे
१९ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा