एस.टी. संपाचा प्रश्न चिघळतो आहे. एक साधी गोष्ट का कोणाच्या मनात येऊ नये हा प्रश्न पडतो. एस.टी.ची शेकडो स्थानके आहेत. त्या जागांचा वापर स्थानकासह व्यावसायिक पद्धतीने केला तर उत्पन्न वाढू शकणार नाही का? व्यवसाय, यात्राजत्रा, लग्नकार्य, कौटुंबिक कामे, शेतीवाडी, नोकरी, सहल; अशा विविध कारणांनी लोक सतत फिरत असतात. मुंबई महानगरापासून तर एखाद्या पाचशे हजार लोकवस्तीच्या गावापर्यंत. या लोकांच्या राहण्या जेवण्याची दर्जेदार सोय माफक दरात करण्यासाठी स्थानकांच्या जागा विकसित करता येऊ शकतात. अशा लोकांना पंचतारांकित सोयींची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते. फक्त स्वच्छता, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, सुरक्षा, चांगले वातावरण एवढेच हवे असते. याशिवाय सौर ऊर्जा तयार करून विकता येऊ शकेल. मर्यादित प्रमाणात साठवणुकीची सोय उपलब्ध करून देता येईल. पण कोणाला काहीच करायचे नाही असेच दिसते. यात राजकीय वादावादी नसावी पण सगळ्यांना त्याची खुमखुमी असते म्हणून फक्त एक नोंद - मध्यंतरी पाच वर्षे भाजपचं राज्य होतं. त्यावेळीही असं काही ऐकू आलं नाही, दिसलं नाही.
- श्रीपाद कोठे
१८ नोव्हेंबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा