कर्माची प्रेरणा आणि परिणाम दोन्ही ईश्वरी असतात. चांगल्याचा परिणाम चांगला, वाईटाचा वाईट वगैरे काही नसतं. किंवा ते तसं सिद्ध करता येत नाही. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि बांगला देशाची निर्मिती या चांगल्या गोष्टी करूनही इंदिराजींची हत्या झाली. आपल्याकडून होणाऱ्या कर्माची स्फूर्ती, प्रेरणा, इच्छा या अज्ञात शक्तीकडून येतात. अन त्या कृतीचे परिणाम कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित, कधी अनाकलनीय असतात. थोडेफार ठोकताळे आपण सांगतो, पण सूक्ष्मता, अचूकता, पूर्णता आपल्या हाताबाहेरचे असते. योग्य वाटते ते करणे आणि सोडून देणे. 'करम की गती न्यारी'.
- श्रीपाद कोठे
४ नोव्हेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा