छात्या पुढे काढत आपल्या पौरुषाचं नेहमी प्रदर्शन करत फिरणारे पोलीस कर्णकर्कश्श गाणी वाजतात तेव्हा शेपूट घालून काय करत असतात? की त्यांना काहीही ऐकू येत नाही. सगळं पोलीस दल बहीरं आहे का? प्रत्येक वेळी तक्रारी अन बिक्रारीची काय गरज. फिरत्या गाड्या काय झक मारतात? रात्री अमुक वाजेपर्यंत गाणी वाजवायला परवानगी याचा अर्थ लोकांचे कान आणि डोके फोडायला परवानगी असा होतो का? लोकांनी तेवढा वेळ काय करायचे? केवळ मुकाटपणे अत्याचार सहन करायचा?
सरकार, आमदार, मंत्री वा कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते करणार नाहीतच काही; तरीही विनंती करतो की, जनतेच्या भल्याचं काही करायचं असेल तर हे तमाशे कायमस्वरूपी थांबवा. तुम्ही करणार नाही कारण जनता गेली तेल लावत तुम्हाला फक्त एकेक मत मोलाचं असतं. तुम्ही फक्त चुलीत घालायच्या लायकीचे आहात असं किमान अशा वेळी वाटतं.
सोशल मिडीयावर अतिशय सक्रीय असलेला जनता जनार्दनदेखील याविरुद्ध बुलंद आवाज उठवणे, जनमत तयार करणे, सामाजिक दबाव वाढवणे, याऐवजी सेल्फ्या टाकण्यात धन्यता मानतो. आग लागो आपल्या सगळ्यांना.
- श्रीपाद कोठे
५ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा