शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

संविधान दिवस आणि आर्य चर्चा

लोकसभेत आज सुरु असलेल्या `संविधान दिनावरील' चर्चेच्या वेळी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरळण्यावरून काँग्रेसची सहिष्णूता किती पोकळ आहे हे स्पष्ट झालं. गृहमंत्री बोलत असताना काहीही संदर्भ नसताना उठून उभं राहायचं अन `तुम्ही आर्य परके आहात. आम्हीच पाच हजार वर्षांपासून राहतो. हा देश तुमचा नाही', वगैरे बेंबीच्या देठापासून ओरडायचं हीच यांची सहिष्णूता. बरं जो मुद्दा आपण मांडतो आहे त्याचा किंचित तरी विचार करायला हवा की नको. खुद्द ज्यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त संविधान दिवस साजरा होत आहे, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `आर्य या देशात बाहेरून आले' हा सिद्धांत खोडून काढलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी तो सिद्धांत फेटाळला आहे. गांधीजींना तो सिद्धांत मान्य नव्हता. विदर्भातील प्रज्ञावंत जन्मांध (वयाच्या ११ व्या महिन्यातील अंधत्व) संत गुलाबराव महाराज यांनीही तो सिद्धांत खोडून काढला आहे. (गुलाबराव महाराजांचा उल्लेख मुद्दाम केला. त्यांची दखल घेणं का आवश्यक आहे हे समजण्यासाठी जिज्ञासूंनी ते अन त्यांचे साहित्य जाणून घ्यावे.) असे अनेक आहेत. `आर्य बाहेरून आलेत' हा सिद्धांत आता कोणीही ग्राह्य धरत नाही. वादासाठी तो ग्राह्य धरला तरीही, खरगे यांनी हे स्पष्ट करावे की, ते ज्यांच्या पायी नतमस्तक होतात ते गांधी घराणे अन त्याचे मूळ पुरुष असलेले समस्त नेहरू, यांनाही ते भारतात उपरेच मानतात का?

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा