विस्ताराने लिहीन पण तूर्त एक मुद्दा विचारांसाठी. चाणक्य हा भारताचा एकमेव प्रतिनिधी नाही. ज्ञानेश्वर हा सुद्धा भारताचा प्रतिनिधी आहे. चाणक्य नीतीने पसायदानाचा गळा घोटू नये. आमचे वर्तमान चिंतन अभारतीय विचारांवर सुरू आहे. योग्य विचार आणि मूल्यांचे चिंतन, जे तात्विक स्तरावर व्हायला हवे ते संपले आहे. खूप गंभीरपणे या विषयाकडे पाहिले जायला हवे. विचारांच्या स्तरावर भयावह स्थिती आहे.
- श्रीपाद कोठे
२२ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा