मुस्लिम दहशतवाद हा आता anti hindu, anti christian राहिलेला नाही. इजिप्तमध्ये शुक्रवारी मशिदीत झालेला बॉम्बस्फोट याचे ताजे उदाहरण आहे. त्यात थोडेथोडके नव्हे, तीनशेहून अधिक लोक मारले गेलेत. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम देशांमधील अनेक घटना आणि घडामोडी हेच दाखवतात. एक मुस्लिम renaissance आकारास येते आहे. भारतातदेखील त्रिवार तलाक असो किंवा रामजन्मभूमीचा मुद्दा असो; हे दिसून येते आहे. परंतु १३००-१४०० वर्षांचा इतिहास सहजासहजी विस्मरणात ढकलणेही चुकीचेच आणि तोच धरून ठेवणेही अयोग्य. विभिन्न विचारांचा, आचारांचा, व्यवहारांचा, धारणांचा, भावनांचा समन्वय घडवणे आणि त्यांना व्यापक मानवी जीवनाचे एकात्म अंग बनवणे ही भारताची विशेषता आहे आणि नियतीही. त्यामुळे मुस्लिम दहशतवादाच्या संदर्भात cautious and prudent असाच approach हवा. काळानुसार हाही बदल आवश्यक आहे.
- श्रीपाद कोठे
२७ नोव्हेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा