झी टॉकीजवर तृतीयपंथीयांवरचा 'जयजयकार' सुरू आहे. बाकी तर ठीक आहे पण दिलीप प्रभावळकर यांचं ज्येष्ठ नागरिकाचं पात्र छान आहे. एका अंगठीवरून त्याचा तृतीयपंथीय टोळीशी संबंध येतो. ही अंगठी त्याच्यासाठी एवढी महत्वाची का? कारण ती देवाघरी गेलेल्या बायकोच्या हेअर पिनची बनवलेली असते. अन त्यात खडा म्हणून गेलेल्या मुलाचा दुधाचा दात बसवला असतो.
सहज अरुणा ढेरेंची कविता आठवली - 'पुरुष असाही असतो'
- श्रीपाद कोठे
३ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा