शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

संविधान

Mirror Now वर संविधान दिना निमित्त चर्चा पाहिली, ऐकली. राज्यघटनेचे पाच जाणकार होते. राजकीय व्यक्ती एकही नव्हती. सोली सोराबजी, ऍड. सुंदरम, ऍड. हेगडे असे लोक होते. या वाहिनीचे एकूण स्वरूप लक्षात घेता एकूण चर्चेचा रोख थोडा भाजप विरोधी होता. त्यात नवीन काही नाही अन आक्षेप घेण्यासारखेही काही नाही. पण एकूण चर्चा अतिशय उच्च दर्जाची होती. परंतु ही गंभीर चर्चा ऐकताना हे जाणवले की अजूनही आपली बौध्दिकता स्वप्नाळू गुलाबीपणात वावरते आहे. वेदांनी म्हटले आहे की, वेद वाचून सत्यलाभ होणार नाही. कुठेतरी आपली बौध्दिकता या धाडसापासून दूर राहते. फक्त ऍड. सुंदरम यांनी एक मूलभूत मुद्दा उपस्थित केला की, आज घटनेला धोका आहे असे वाटत असेल तर तो कोणाकडून? ज्यांच्यासाठी ही घटना आहे त्या समाजाकडून. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, ज्या समाजासाठी ही घटना आहे तिला ती आपली का वाटत नाही? अन तिच्यासाठी असलेल्या घटनेनुसार वागताना ती का दिसत नाही?

मला वाटते, यापुढील या विषयाच्या चर्चा या प्रश्नांपासून सुरू व्हायला हव्यात. खूप मोठा विषय आहे. पण तो दृष्टीआड करून चालणार नाही. नाही तर सगळं बरंच बरं आहेच.

- श्रीपाद कोठे

२६ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा