त्र्यं. र. देवगिरीकर यांनी लिहिलेले सरदार पटेलांचे चरित्र वाचतो आहे. त्यात १९३८ च्या हरिपुरा काँग्रेसची माहिती आहे. त्यात असा उल्लेख आहे की - राजबंदी मुक्त करणे हे काँग्रेसने प्रांतिक निवडणुकीत दिलेले आश्वासन होते. हिंसेच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगणारे बरेच जण अंदमानात होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी गांधीजी, वल्लभभाई वगैरेंनी प्रयत्न केले.
बाकी थोडी या प्रकरणाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची त्रोटक चर्चा आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संदर्भात. सहजच सावरकरांच्या सुटकेची, माफीनाम्याची आठवण झाली. दोहोंचा संबंध नाही पण हा विषय आज ज्या पद्धतीने हाताळला जातो तो तसा नाही हे म्हणता येऊ शकते. कारण अंदमानातील कैद्यांची सुटका हा विषय काँग्रेसनेही हाती घेतला होता. यावर अधिक माहिती आणि विश्लेषण व्हायला हवे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकायला हवा.
- श्रीपाद कोठे
४ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा