रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

काँग्रेस आणि संस्थानिक

तत्कालीन स्थिती आपल्याला अनेकदा माहिती नसते आणि आपण आपल्या कल्पनेने भूतकाळ रंगवत असतो. इंग्रज भारतात असताना संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेश आणि संस्थानिकांच्या ताब्यात नसलेला प्रदेश असे देशाचे दोन भाग होते. इंग्रजांचा अंमल दोन्हीकडे होता. पण काँग्रेस पक्षाचे काम १९३८ पर्यंत संस्थानिकांच्या ताब्यात नसलेल्या प्रदेशातच होते. १९३९ च्या अधिवेशनात संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेशात काम करण्याचा ठराव करण्यात आला. संस्थानिकांची ही संख्या ६०० च्या जवळपास होती. (पटेलांनी सामील केलेली संख्या ५६५ होती. ती पाक वेगळा झाल्यानंतरची.) म्हणजेच १९३९ पर्यंत मोठ्या भूप्रदेशात काँग्रेसचे कामच नव्हते. किमान अधिकृतपणे. नंतरच्या तीन वर्षात, म्हणजे १९४२ पर्यंत त्या प्रदेशात कितीसं काम झालं असेल? 'चले जाव' आंदोलनाचं मूल्यमापन करताना ही वस्तुस्थितीही लक्षात घ्यावी लागेल.

- श्रीपाद कोठे

७ नोव्हेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा