काल संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण झाले. त्यांनी अधिकार आणि कर्तव्याचा महत्वाचा मुद्दा मांडला. पण तोही आता जुना झाला आहे. सहज एक लेखमाला आठवली. स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर साप्ताहिक विवेकमध्ये लिहिलेली. दर आठवड्याला लेख येत असत. बऱ्याच गोष्टींचा उहापोह होता. त्या लेखमालेचा समारोप करताना एक खूप महत्त्वाचा आणि मूलभूत बिंदू त्यांनी मांडला होता. 'मी एखाद्याचे शोषण का करायचे नाही' या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय जगातील शोषण थांबणार नाही. या basic, fundamental, philosophical बिंदूपर्यंत विचारप्रक्रिया पोहोचत नाही तोवर सगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अपुरेच ठरणार. सगळ्या षडविकारांचा नाच सुरूच ठेवून, त्याला खतपाणी घालत, त्यांचे चोचले पुरवत; चांगल्या मानवाची अपेक्षा करणे हे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ज्या 'न्याय' या तत्वाची चर्चा होते तो 'न्याय' सुद्धा, अशा स्थितीत संदर्भहीन होतो. 'न्याय' या तत्त्वाने आजवर अन्याय, क्षोभ, अस्वस्थता, अशांती, सूड, प्रतिशोध यांनाच मोठ्या प्रमाणावर जन्म दिला आहे. यात भारतीय, अभारतीय असे काही नाही. विचारांची आव्हाने खूप मोठी आहेत.
- श्रीपाद कोठे
२७ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा