काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू प्रत्येक जीवाच्या ठायी असतात. अठरापगड जातीतील कोणतीही जात असो- वरची, खालची, मधली वगैरे; कोणत्याही धर्माचा अनुयायी असो; कोणत्याही देशाचा नागरिक असो; कोणतीही राज्यघटना असो; स्त्री असो की पुरुष असो; वृद्ध असो की बालके असो; सगळ्यांमध्ये हे सहा रिपू inbuilt असतात. याचा अर्थ सगळे सारखे दोषी किंवा निर्दोष, सारखे गुणसंपन्न किंवा अवगुणी असतात असे नाही. या सहा रिपूंचं नियंत्रण, नियमन करत करत जीव जगतो. यांच्या कमीअधिक प्रमाणानुसार, यांच्या त्या त्या वेळच्या प्रयोजनानुसार व्यवहार पाहायला मिळतो. म्हणूनच एखादा शूरवीर सुद्धा प्रसंगी भेकडासारखा वागू शकतो, अन एखादा शेळपट शूरवीरासारखा. सगळ्या परस्परविरोधी गोष्टींना हे लागू होऊ शकते. म्हणूनच कोणतेही watertight classification चुकीचे असते. दुर्दैवाने वैज्ञानिक विचारपद्धती किंवा वास्तववादी विचारपद्धती या नावांनी अशा watertight classification ची सवय लावण्यात आली आहे. जी मुळात अवैज्ञानिक, अवास्तव अन अशास्त्रीय आहे.
सहिष्णूता- असहिष्णूता यावर सध्या जे वादविवाद सुरु आहेत त्या संदर्भात ही मूळ बाब दृष्टीआड झालेली पाहायला मिळते. तशी ती बहुतेक वेळाच दृष्टीआड होते, हा भाग अलाहिदा.
- श्रीपाद कोठे
२४ नोव्हेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा