दिल्लीच्या तीनही महानगरपालिकांच्या हद्दीतील शाळा वायू प्रदूषणामुळे काही दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता यावर खूप चर्चा होतील. समर्थक आणि विरोधक निर्माण होतील. त्यांचे राजकीय वर्गीकरण होईल. आरोप प्रत्यारोप होतील. मध्यममार्गी म्हणून मिरवीत काही जण पुढे येतील. मग हे प्रदूषण कमी करण्याच्या उपायांवर काथ्याकुट केला जाईल. काही दिवस काही उपाय होतील. थातुमातूर काहीतरी होईल. पुन्हा काही दिवसांनी (महिन्यांनी, वर्षांनी) पहिल्या वाक्यापासून सुरुवात होईल.
विचार आणि भावना स्पष्ट, व्यावहारिक, सशक्त नसणे हे एकमेव कारण.
१) आज अवाढव्य वाढणारी महानगरे मर्यादित करण्याचा विचार का होत नाही?
२) राज्यकर्ते म्हणतात लोकांची मागणी, लोक म्हणतात पर्याय नाही, उद्योजक-व्यापारी- गुन्हेगार- म्हणतात चाललंय तेच योग्य आहे; लुटालूट करायला बरं आहे.
३) विचारवंत अज्ञानी, मूर्ख, स्वार्थी किंवा लाचार आहेत.
माझ्या सूचना-
१) महानगरे मर्यादित असावीत. किमान १ लाख आणि कमाल १० लाख लोकसंख्या असावी.
२) समाजाने rat race चा मुर्खपणा सोडावा.
३) व्यापारी, उद्योजक यांनी थोडी तरी लाजलज्जा बाळगून समाज, नीतीमत्ता, पर्यावरण, माणुसकी यांचा विचार करून आपापल्या कामधंद्याचा विचार करावा.
४) राजकारण्यांनी अहंकार जरा कमी करावा.
५) विचारवंतांनी भाटगिरी सोडून विचारवंत व्हावे.
६) प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था स्थापित करण्याचा प्रयत्न व्हावा.
७) आपणच प्रश्न निर्माण करणे, ते सोडवण्याचा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ या भावनेचा त्याग करणे, तीच ती घाण चिवडत राहण्याची सवय सोडून; मन, बुद्धी, भावना, विचार, संकल्पना या सगळ्यांनी अधिक सशक्त आणि सार्थक होण्याचा प्रयत्न करणे.
- श्रीपाद कोठे
५ नोव्हेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा