सकाळी गाणे ऐकले- `उठी श्रीरामा प्रभात झाली... उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माउली'. थोड्या वेळापूर्वी रोणू मुजुमदारची बासरी ऐकली. राग गोरख कल्याण. सकाळी गाणे ऐकताना जाणवले- तीन मिनिटांच्या त्या गाण्यात किती variations आहेत. किती सौंदर्यस्थळे आहेत. रोणुची बासरी ऐकताना जाणवलं- पहिला अर्धा तास बासरीशिवाय दुसरं काहीही नाही. तबला सुद्धा नाही. तरीही जग विसरायला लावण्याची ताकद त्यात आहे. अर्थात नंतरच्या अर्ध्या-पाउण तासातील तबल्यासह असलेली बासरीही गोडच आहे. अन आता कानावर पडते आहे कुठेतरी लग्नानिमित्त सुरु असलेले संगीत. मनात प्रश्न आला, तसा तो नेहमीच येतो- माणूस इतका विकृत का झाला असेल? ताल सूर कशाकशाचा काहीही संबंध नाही. ताल म्हणजे फक्त ढण ढण आणि ढण !!! अन संगीत म्हणजे त्या ढणढणचा वाढता आवाज. या विकृत वातावरणातून सुटका कधी होणार समाजाची कोणास ठाऊक. मोदीजी, नोटबंदीच्या दिवशी एक सूचना करावीशी वाटते. या तथाकथित वाद्यांवर आणि संगीतावर कठोर बंदी आणा. किमान भारतातून ते पूर्ण हद्दपार करा. तुमच्यावर रागावून, त्या संगीतापाठी कोणी देश सोडून जाणार असतील तर जाऊ द्या. अगदी देश रिकामा रिकामा झाला तरी चालेल. भारतभूवरचा भार अनेक अर्थांनी हलका होईल. मरोत या ढण ढण संगीताचे चाहते.
- श्रीपाद कोठे
८ नोव्हेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा