- समाज अथवा सरकार माणसाला सुख देऊ शकतात का? सुखाची जाणीव किंवा समाधान या अर्थाने नाहीच देऊ शकत. परंतु सुखसाधने, व्यवस्था, वातावरण या अंगानेही माणसाला किती सुखी करू शकतात, किती सुख पुरवू शकतात? स्वप्नाळूपणा बाजूला ठेवून शक्यतांचा विचार करायला हवा.
- समाज ही सुद्धा मानवी विकासाची अंतिम अवस्था राहू शकत नाही.
- मानवी शरीराच्या उत्क्रांतीप्रमाणे त्याच्या मानसिक, बौद्धिक, भावनिक, जाणीवयुक्त, सांस्कृतिक, आध्यात्मिक उत्क्रांतीचाही विचार महत्वाचा आहे.
- आदर्श समाज नव्हे मानवमुक्ती हा भारतीय जीवनाचा आदर्श आहे. त्यासाठी सुव्यवस्थित समाज हा एक टप्पा आहे.
- श्रीपाद कोठे
१२ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा