दोन दिवस सुरू असलेल्या राजधर्म चर्चा ऐकताना महात्म्याने सांगितलेल्या पुत्रकर्तव्याची आठवण येत होती.
महात्मा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांच्या विरोधात वातावरण पेटले होते. पोलीस त्यांना लपवून सुरक्षित घेऊन जात असताना लोकांना कळले आणि लोकांनी त्यांच्यावर अंडे टमाट्यांनी लाठ्यांनी हल्ला केला. अर्थात पोलिसी मदतीने फार काही झाले नाही.
महात्म्याच्या मुलाला वेगळ्या मार्गाने नेण्यात आले होते. पिता पुत्राची भेट झाल्यावर मुलाने विचारले होते - मी तुमच्यासोबत असतो तर माझे कर्तव्य काय राहिले असते? क्षणाचाही वेळ न लावता महात्मा म्हणाले - पुत्राने पुत्रकर्तव्य करायला हवे.
वडिलांना त्रास देणाऱ्या लोकांशी मुलाने कसे वागायचे असते? जगात सगळ्यांना ते ठाऊक आहे.
अटल बापा तुझ्याशी वाईट वागलेल्यांची तर यादीही अजून व्हायची आहे.
- श्रीपाद कोठे
१८ ऑगस्ट २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा