शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

कर आणि वर्गणी

एक खूप छान नाही, पण मार्मिक विडंबन काल परवा छोट्या पडद्यावर पाहिलं. विषय गणेशोत्सव. स्थानीय गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता एका काकांकडून वर्गणी आणि जाहिरात मिळून सहा हजार रुपये उकळतो. संबंधित काकूंना हे कळल्यानंतर त्या हुशार काकू त्या कार्यकर्त्याकडे जातात आणि घरच्या गणपतीसाठी म्हणून वर्गणी काढतात. सहा हजार रुपये परत मिळवतात. नंतर १५१ रुपये वर्गणी देतात आणि एक वाक्य बोलतात-

`अरे बाळा, लोक स्वखुशीने देतील ना तेवढी वर्गणी घ्यावी. त्या पैशात जेवढा आणि जसा जमेल तसा; जास्तीत जास्त चांगला आणि भक्तिभावाने गणेशोत्सव करावा. त्यालाच गणपती पावेल.'

आजच्या जमान्यात बहुतेक जण कानाआड करतील असे हे मार्मिक वाक्य. `उपदेश' या शब्दाने सारं काही मोडीत काढण्याची सध्याची रीत. मला उगीचच चाणक्य आठवून गेले. कर किती असावा यावर चाणक्याचं प्रसिद्ध उत्तर आहे- `मधमाशी फुलातून मध गोळा करते तेवढा. फुलाला जाणवणार सुद्धा नाही असा.' या कररुपी मधातूनच राज्य चालवायचं. विडंबनातल्या काकू आणि चाणक्य यांच्यात एक विलक्षण साम्य जाणवून गेलं. अन मनात आलं- सहा हजार रुपये उकळणाऱ्या कार्यकर्त्याला आपण बदमाश म्हणतो. ते बरोबरच आहे. कर, सेस आणि अन्य वसुली करणाऱ्या मंडळींना...

- श्रीपाद कोठे

२८ ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा