बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

दुर्दैव

मराठी कौटुंबिक मालिका भांडणे, द्वेष, अनीती, अश्लिलता, असामाजिकता; वगैरे वगैरे दुर्गुणांमुळेच निरर्थक आहेत असं नाही; तर सद्गुण, चांगुलपणा, समजुतदारी यांच्या नावाने दाखवणाऱ्या मूर्खपणामुळेही निरर्थक आहेत. या मालिकांचे लेखक, निर्माते यांच्या अकलेवरच खरं तर प्रश्नचिन्ह लावायला हवं. अन तरीही या मालिका चालतात, लोकप्रिय होतात, त्यांच्या चर्चा होतात, अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते; हे सगळंच अनाकलनीय आहे. अन्य सगळ्याच सराईत, सफेदपोश गुन्ह्यांप्रमाणेच. अन समाजाची चिंता वगैरे करणाऱ्यांना भगव्या, लाल, निळ्या, हिरव्या, पांढऱ्या, तिरंग्या राजकारणाशिवाय दुसरं काहीही दिसत, जाणवत नाही. अन ते राजकारण सुद्धा राष्ट्राला क्षीण आणि दुर्बळ करणारं. याला दुर्दैव म्हणायचं की दैवदुर्विलास? जाणीव न होणे, संवेदना नसणे हे विकृतीचं लक्षण असतं ना?

- श्रीपाद कोठे

२५ ऑगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा