गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

ताकद

काल मोक्षधामवर वं. उषाकाकूंचा अंत्यसंस्कार सुरु होता. सहज लक्ष गेलं छात्रावासातील मुलींकडे. सुदूर ईशान्य भारतातून इथे आलेल्या या मुलींचे आपल्या आजीला निरोप देतानाचे चेहरे आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून, गेल्या वर्षीच्या एका वादळाची आठवण झाली. समितीतर्फे या मुलींना भारताच्या विविध भागात आणून त्यांची तस्करी केली जाते, अशा आशयाचा एक घाणेरडा, दळभद्री अहवाल एका पत्रकार महिलेने तयार केला होता त्याची. अन काल या मुलींच्या डोळ्यातील पाणी पाहून मनात आलं- अरे असा एकच अहवाल काय, असे लाखो कारस्थानी अहवाल पाल्यापाचोळ्यासारखे उडवून लावायचं सामर्थ्य या एकेका अश्रूत आहे. कारण ते सच्चे आहेत, सत्वयुक्त आहेत. शुद्ध सात्विक प्रेमाचं हे सत्व जोवर आहे तोवर कोणाची काय बिशाद?? `क्रिया सिद्धी: सत्वे, भवती महतां नोपकरणे'

- श्रीपाद कोठे

१९ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा